Thursday 25 September 2008

पाँडिचेरी भेट - भाग पाच - मातृमंदीर आणि रमण आश्रम

तर पुढंचा megaevent होता... मातृमंदीर

तिथे एक प्रचंड मंदीर - मातृमंदीर होते - कळसाशी घुमटाकार होत जाणारे. सुरुवातीपासूनच शांतता ठेवली जात होती म्हणजे निदान लोकांनी बाह्यत: तरी शांत रहावं याकरीता - थोडक्यात हळुहळु स्वत:पासूनच सुरुवात करणे हा सोपा धडा मिळत होता! पुढे त्या प्रचंड घुमटाकार वास्तुमध्ये आम्ही गोलाकार जिन्यावरुन वर चढत राहिलो. सर्वात वरती कळसाशी मातृमंदीर पाहून २ कल्पना जाणवून गेल्या. 

एकतर मदरना म्हणायचे असावे की - सर्व काही खालीच सोडून द्या. शांतता जाणवू द्या. इतकया उंचीवर या - तुम्हाला आपोआप एकाग्रता जाणवेल किंवा गुंतागुतीच्या शरीरप्रक्रियेतला महत्त्वाचा भाग - मस्तक - मस्तकाशी जाणिवेचा निगम करा. कुंडलिनी जागृती सुध्दा अशीच शेवट - चिदाकाशात होणे - असा विचार - गुरफटतच मातृमंदीरत पोहोचलो. आत गेल्यावर जे काही घडलं / जाणवलं किंवा अनुभवलं ते व्यक्त करणं म्हणजे वार्‍याला चिमटीत धरणं किंवा कालचक्र उलटं फिरवणं जमलं तरचं ते लिहिता येइल. एक प्रचंड शांततेची लाट, आपणं तिच्यात बुडतोय. कानात शांती, डोळे शांत. चित्त शांततेत उठवणारे तरंग - भेलकांडत स्थिर होऊ पाहतंय शांततेची अजोड अनुभूती. सगळीकडे प्रगाढ शांतता नी समोर दिसणारा चौकोनावर ठेवलेला प्रचंड लोलक नी वर पासून केवळ सूर्यप्रकाशात न्हालेली जागा. एक

रम्य, अदभुत अनुभव. वाटलं की यातली जर थोडी शांती, थोडा चैतन्याचा कणशः का होईना पण भाग जर नेता आला तर? स्वर्गात जायची संधी मिळाली पण परतताना त्या रससुधेतला थोडासा बिंदुरुपी भाग नेता आला तर? आणि मग लक्षात आलं - नव्हे लख्ख जाणवत गेलं की हे मातृमंदीर - तुमचं शरीर नी चित्त स्थिर करण्याच्या, निर्विचाराच्या केवळ इवल्याशा प्रकाशानं तुमचं चिदाकाश उजळून निघणार आहे. कसं सुचलं असेल हे त्या मातेला नी त्या तत्त्वदर्शी ऋषिवराला? जगजेत्यानंही इथं झुकावं अशी अवर्णनीय कल्पनाशक्ती नव्हे तिचा इथे झालेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा विस्फोट ! पण राहून राहून वाटतयं, असेल का आपल्यात ते चैतन्य किमान जाणवण्याइतपत का होईना पण पात्रता?

२९ सप्टेंबर

आज सकाळी हो /  नाही करता करता एकदाचे तयार झालो नी रमण आश्रमाची गाडी धरली. आम्ही दोघेही रमणाश्रमाबद्दल पूर्णतया अनभिज्ञ! फक्त ते एक सेल्फ रिअलायझेशन असणारे ऋषीवर होते इतकेच माहिती. गाडीला दुतर्फा भाताची रोप लावणी झालेली शेतं नी साधारण हिरवागार परिसर! काही वेळातर माझ्या डोळ्यांसमोर आपल्या इथला राधानगरी रोडच तरळू लागला. ११.०० वाजता आम्ही तेथे जाऊन पोचलो. माकडं, कुत्री नी मोरांना एकत्र पाहिलं. मोरांचा केकारव - माणसाळलेले मोर आणि भव्य हॉलसकट ध्यानमंदीर असणारा तो रमणाश्रमाचा रम्य परिसर. महर्षींना १६व्या वर्षीच आत्मज्ञान प्राप्त झालं. ती त्यांच्या अकस्मित आजारपणाची गोष्ट - मग देहापासून वेगळे 'मी'चे अस्तित्व जाणवले. सर्वच सर्व सुरुवातीपासून स्वरुपानंदांच्या चरित्राशी मिळतेजुळते. मी आता घरी गेल्यावर आईला विचारेन. नंतरचा प्रसाद तर मन आणि जिव्हा - दोन्हीही लोभवणारा. पायसम आणि खजुराचं गोड खाऊन 'जीव धन्य जाला'. एकूणचं आजचा प्रवास छान - ठिकाणं सुंदर नी ध्यान ही चांगले झाले.

क्रमशः

सुप्रिया

No comments:

Post a Comment